आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी करून घ्यावी : मृदुला मोरे तहसीलदार, मूल

 

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*

मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुल तालुक्यातील समस्त शेतकरी व जनतेस कळविण्यात येते की, माहे जुन २०२५पासुन पावसाळा हा मानसुन कालावधी सुरु झालेला आहे. या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये अवेळी पाडुस, अतिवृष्टी व वादळ वारा पुरपरिस्थीतीमुळे शेतपिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये भविष्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतपिक नुकसान अनुदानाकरीता अॅग्रिस्टक योजनेअतंर्गत सर्व शेतकरी यांचे फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. शेतकरी यांचे फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक तयार केले नसल्यास शेतकऱ्यांना शेतपिक नुकसान अनुदानचा लाभ मिळणार नाही.

करीता मुल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील मौजा या गावातील सर्व शेतक-याना आव्हान करण्यात यावे की, शासनाच्या विविध राबविण्यात येणा-या योजनाच्या लाभाकरीता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेले असल्याने संबधित गावातील शेतक-यांचा व त्याच्या शेतांचा आधार संलग्न तयार करण्याकरीता प्रत्येक शेतकरी यांनी आपल्या ७/१२ ला आधार लिंक करुन घेणे आवश्यक आहे. असे सर्व ग्राम पंचायत स्तरावरून शेतकऱ्यांना कळविण्यात यावे. असे आव्हान मुल तहसीलदार मृदुला मोरे यांनी एका जाहीरनाम्याद्वारे केले आहे.

आकस्मिक अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे नुकसान झालेल्या शेतपिक अनुदानाकरीता शेतकरी फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे. करीता सर्व शेतकरी यांनी आपल्या गावातील नागरी सुविधा केंद्र (CSC) येथुन ७/१२ला आधार लिंक नोदंणी करुन शेतकरी फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक तयार करणे आवश्यक असल्याबाबत वेळोवेळी सुचित करण्यात आलेले आहे.

परंतु अदयापही ज्या शेतक-यानी अॅग्रिस्टक फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक नोदंणी केलेली नाही त्या शेतक-यांनी तात्काळ अॅग्रिस्टक नोंदणी करुन घ्यावी. जर का ओळख क्रमांक नोंदणी केली नाही तर भविष्यात शेतकऱ्यांना शेतपिक नुकसान अनुदानपासुन वचिंत रहावे लागेल. व शेतपिक नूकसान अनुदान न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शेतकऱ्यांची राहील. त्याकरीता तहसील कार्यालय जबाबदार राहणार नाही. याची तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. असे आव्हान तहसीलदार मृदुला मोरे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.