▪️शासनाने पंधरा हजार प्रती क्विंटल दराने जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत -महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागनी..
राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
धुळे : ( इंडिया 24 न्यूज ) – मागील वर्षाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आजही पडून आहे त्या कापसाला सहा हजार साडेसहा हजार हमीभाव अपेक्षाही कमी दराने व्यापारी घेत आहेत.
आणि मजबुरी म्हणून आमचा शेतकरी देत आहे मागील वर्षाचा उत्पादन खर्च आणि या वर्षाचा उत्पादन खर्च यामध्ये खूप मोठा फरक पडला असून या वर्षाला उत्पादन खर्च जास्त झालेला आहे. आणि कापसाचे उत्पन्न कमी आलेले आहे म्हणून राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती साठी जिल्ह्यांमध्ये कापूस खरेदी केंद्र चालू करावेत प्रती तालुक्याला कमीत कमी दोन ते तीन ठिकाणी हे केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल पंधरा हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी माननीय सोपान कासार साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आले.
निवेदनावर भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा तालुकाध्यक्ष डॉ विनोद चौधरी, पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शासनाने याकडे गांभीर्याने पहावे कारण शेतकरी हा बि बियाणे खरेदी करण्यापासून ते आपला शेतातील माल विकण्यापर्यंत सर्व बाजूंनी शोषित घटक आहे आणि त्यातच मध्येच अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेले उत्पन्न वाया जाते केलेला संपूर्ण खर्च माथी पडतो, म्हणून अपेक्षा फक्त शासनाकडून करतोय आणि शासन ती अपेक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.
अन्यथा संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे शेतकरी नेते सुनील देवरे यांनी सांगितले.