▪️पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज – प्रशांतभाऊ गाडेवार
▪️खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क तर्फे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा..▪️जागतिक पर्यावरण दिन सप्ताह निमित्याने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प..
संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर
सावली – ( इंडिया 24 न्यूज ) : प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातील बदल, जागतिकीकरण, रसायनाचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याचे चित्र आहे. वाढते तापमान व त्याचे दुष्परिणाविषयी सतत चर्चाही केली जाते. यंदा तर दुष्काळामुळे तीन महिन्यांपासून तापमानाची चाळिशी आजही ‘जैसे थे’ आहे. मोसमी पाऊस उंभरठ्यावर असताना उष्णतेची काहिली मानवासह पशुपक्ष्यांनाही नकोशी झाली आहे.
यंदा प्रथमच शासकीय यंत्रणा व सोशल मीडियावर वृक्षारोपणाची किती आवश्यकता आहे याची जोरदार चर्चाही होत आहे. उपाययोजनाही सुचविल्या जातात. पण अंमलबजावणीबाबत मात्र तितकीशी सजगता नसल्याने या चर्चा फोल ठरतात. अशातच खरे वृत्तांत न्यूज पोर्टल च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन सप्ताह चे आयोजन करून चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी एक हजार वृक्ष लागवड संकल्प करून वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ आज दिनांक ५ जुन २०२४ ला करण्यातआला पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्ष