आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांमध्ये बदल, मासिक उत्पन्न मर्यादाही वाढवली..

सुबोध सावंत :- मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई :(इंडिया 24 न्यूज )प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे दुचाकी,मोटार,फ्रीज,लँडलाईन फोन होते त्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता अखेर या अटी रद्द करण्यात आल्या आहे घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. याशिवाय संबंधित कुटुंबाची मासिक उत्पन्नाची अट देखील 10 हजारांवरुन 15 हजार रुपये करण्यात आलेली आहे.

या अटी अजूनही कायम.
जांच्याकडे 3 चाकी आणि 4 चाकी वाहनं आहेत, किंवा शेतीसाठी लागणारं तीन आणि चार चाकी वाहन किंवा यंत्र आणि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 50 हजार असेल, सरकारी कर्मचारी, नोंदणीकृत अकृषिक क्षेत्रातील उद्योजक, प्राप्तिकर भरणारे व्यक्ती, व्यवसाय कर भरणारे व्यक्ती आणि अडीच एकरांपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तींना पीएम आवास योजना ग्रामीणचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वारे संबंधित नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये ग्रामीण भागात घरं उभारणीशाठी 1 लाख 20 हजार रुपये तर डोंगरी भागातील नागरिकांना 1 लाख 30 हजार रुपयांची मदत केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 सप्टेंबरला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा 2745 कोटी रुपयांचा हप्ता जारी करणार आहेत. झारखंडमधील जमशेदपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.