▪️पर्यावरणाचा समतोल राखने प्रत्येक नागरिकांच कर्तव्य: डी.के आरीकर
▪️ऊर्जानगर येथे २५ वे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : उद्योगाच्या नावावर देशात मोठया प्रमाणावर वृक्षतोड होत असून प्रदूषणामुळे लाखो एक जमिन बंजर झाली असून मानवी जिवन उध्दवस्त व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे विचार २५ व्या पर्यावरण समेलाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी.के.आरीकर यांनी व्यक्त केले.
ते चंद्रपूर येथील ऊर्जानगर येथे कामगार मनोरंजन केंद्र ऊर्जानगर येथे पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने दि.२२ जून २०२५ ला २५ व्या पर्यावरण संमलेनात ते बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द साहित्यीक व विचारवंत डॉ.बळवंत भोयर नागपूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड.हिराचंद बोरकुटे,रिनाताई पांडे मुंबई, डॉ.तुकाराम धोबे, डॉ.देव कन्नाके, टेमराज भाले, महादेव वैद्य,अर्चना राठोड, एलीजा बोरकुटे, अतुल कोल्हे यांची मंचावर उपस्थिती होती.सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाची पुजा करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.सदर कार्यक्रमात पर्यावरणावर आधारित मुलांनी पथनाट्य सादर करून वृक्ष वाचविण्याचा संदेश दिला. त्यानंतर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या डॉ.धनराज खानोरकर, प्रकाश देवगडे, गोपी मित्रा या पत्रकाराचा तसेच सविता कोट्टी यांचा सोबतच उत्कृष्ट काम केल्याबद्दल बीयानी नगर सोसायटी आणि पसायदान जेष्ठ नागरिक संघाचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला बाबाराव भोयर, विनोद दोंदल, रामरत्न देशमुख, प्रदीप महाजन, सुरेखा रडके, महेंद्र शिरोडे, समिक्षा मांडवकर, नमिता पाठक, प्रदीप अडकिने, अतुल ठाकरे, आशिष येडांगे, ल.वि.घागी, पुंडलीक आरीकर रामदास काळे, संजय फाले,संजय भोंगळे, सुधीर कोरडे, सुधाकर मोकदम, विनोद सातपुते, संक्षीप्ता शिंदे, वर्षा कोठेकर,शुंभागी डोंगरवार, सुषमा जांभुळकर, विठ्ठलराव बदखल आणि नागपूर, वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी मोठय संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव हरीश ससनकर यांनी संचालन अपेक्षा जोब तर आभार रामदास काळे यांनी मानले.