▪️टायगर ग्रुपच्या स्व खर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
देसाईगंज – ( इंडिया 24 न्युज ) : शहरात नैनपूर वार्ड येथे तलावा लगत बायपास रस्ता वडसा-आरमोरी रस्त्याला जोडला नसून नागरिकांना शेती काम, ये-जा करण्यासाठी भरपूर त्रास सहन करावं लागत आहे. मार्गावर अनेक अपघात झाले, टायगर ग्रुप नेहमी मदतीसाठी धावून गेले.
रस्त्यांची दुरवस्था बघून टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष शरद राऊत यांच्या सोबत जाऊन प्रशासनला सांगितले मात्र त्यावर कुणाही लक्ष दिले नाही. टायगर ग्रुपने एक पुढाकार घेऊन आपल्या स्व खर्चाने दुरवस्था झालेल्या मार्गावरील खड्डे भरले, नागरिकांसाठी सोयसकर मार्ग केले.
त्यावेळी नैनपूर शाखा प्रमुख सचिन आठवले,मंगेश मुळे,पंकज कांबळे,शुभम नखाते,ओम शेंडे,सुजल देवतळे, मुकेश शेंडे, प्रथमेश बावणे,डिकेश मेश्राम ,संदेश खोब्रागडे,दिप नखाते, बिट्टू लांडे,सुरेश नखाते,सौरभ रणदिवे, प्रणय कांबळे,सत्यपाल कुथे,गजानन नखाते,सत्यवान तोंडरे,रुषभ नखाते, नागरिक उपस्थित होते.