▪️खेळांप्रमाणे सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजचटीने पुढाकार घ्यावा: राजे अम्ब्रीशराव आत्राम

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : भामरागड कोनतेही खेळ हे मानवी जीवनासाठी आवश्यक बाब असते, अशा स्पर्धांचे आयोजन करतांना गावकय्यांची एक जुट दिसून येते सुशिक्षित युवकांनी खेळांप्रमाणे गावाच्या विकासासाठी सुध्दा एक जुटीने पुढाकार घेतल्यास गावाचा नक्कीच सर्वांगीन विकास होऊ शकते, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले
भामरागड तालुक्यांतर्गत येणाय्या खंडी – नैनवाडी येथे वॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोतल होते याबेळी युवानेते अवधेशराव बाबा आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम, गाव पाटील सम्मा कटीया कुडयामी, टेकलाच्या सरपंच काजल दुर्वा, ग्राम विकास अधिकारी वेलादी, झाकीर हुसेन, लालसू कोवसी, विनोद एक्का, संतोष कोवसी, अर्जुन टोप्पो, संजय टोप्पो, मनोज मडावी, झुरू मडावी आदि मान्यावर उपस्थित होते
पुढे बोलताना अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, अहेरी ऊपविभागात पुर्वी निवडक खेळांच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या मात्र, आता सर्वच खेळांचे स्पर्धा होत असतांना दिसून येत आहेत विशेष म्हणजे अतिदुर्गम भागात विविध स्पर्धा होत असल्याचे दिसुन येत आहे ही निश्चित आनंदाची बाब आहे आपल्या भागातिल खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असल्याने या प्रकाराच्या स्पर्धा झाल्यास खेळाडूंना पोषक वातावरण मिळेल , असेही ते म्हणाले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर व्हाॅलीबा स्पर्धा खंडी नैनवाडी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत जवळपास ४२ संघ सहभागी झाले आहेत.



