▪️टेकडा अट्टी नाल्यावरील बांधकाम संथगतीने मागील एक वर्षों पासून लाल परीचे दर्शन दुर्लक्ष..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : सिरोचा तालुका मुख्यालयपासून ३० किमी अंतरावर असलेल्या टेकडा गावत प्रवेश करण्यासाठी मुख्य नाला असलेल्या अट्टी वागु नाल्यावर मागील एक वर्षों पासून बांधकाम शुरू आहे मात्र उर्वरीत बांधकाम संथगतीने सुरू असल्याने परीसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे पुलाच्या बांधकामाअभावी मागील एका वर्ष पासून लालपरीचे दर्शन दुर्लक्ष झाले आहे.
मागील काही महिन्यांपासुन पुलावर बांधकाम पूर्ण पने थंड बस्त्यात असल्याने प्रशासनाप्रती येथील नागरिक तीब्र संताप व्यक्त करत आहे पुलाची बांधकाम त्वरित सुरूकरुन बांधकाम पुर्ण न केल्यास या परिसरातील लोकानी चक्काजाम आंदोलन इशारा देखील केली होता मागील महिन्यात तहसीलदारांना निवेदनाध्दारे करण्यात आली होती.
त्यानंतर कांत्रादराने साईड डायवर्शन तात्परता करून दिली आहे मात्र त्यावरुन जड वाहने निघणे कठीण होत आहे आणि मागील एक वर्षोंपासुन सिरोचा टेकडा रेगुठा बस फेरी एक वर्षापासुन या परिसरात बंद आहे.
बस फेरी बंद असल्याने साठ वर्षीय वृद्धाना आणी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे
यामुळे सर्वसामान्य लोकांना खाजगी वाहनात प्रवास करावा लागत आहे या पुलामुळे बांधकाम थंड बस्त्यात असल्याने एकंदरीत वीस ते पंचवीस गावांपर्यत बस फेरी बंद झाली आहे टेकडा नेमडा पुसुकपल्ली जाफराबाद तसेच टेकडा पुढे असलेल्या रेगुंटा मायाबिनपेटा कोटापल्ली नरसिंहापल्ली परसेवाडा मुलदिम्मा पिरमेडा येल्ला पापय्यापल्ली चिक्केला दर्शवाडा आदी गावचा समावेश आहे पुलावर बाधकाम अपुर्ण असल्याने या गावापर्यत अध्याप बस सेवा पोहोचत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे
महत्त्वचा म्हणजे हा पूल एकंदरीत वीस ते पंचवीस गावासाठी मुख्य प्रवेश द्वार अहे याच पुलावरून ये जा करीत असतात या गावत प्रवेश करण्यासाठी हा मुख्या नाला असुन टेकडा गावाचा प्रवेशद्वार असून या नाल्यावर अगोदर कमी उंचीचा पुल होता त्यामुळे पावसाळयात पूलावरून पाणी वाहत होता पावसाळयात अनेकवेळा पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी काही तासांपुरती बंद राहतात आणि खूप जूनी बांधकाम असल्याने जीर्णवस्थेत होती पावसाळयात दरम्यान नाल्यावरून पाणी वाहायचे म्हणून येथील गावकन्यांनी नवीन उंच पुलाची बाधकाम करण्यात यवी अशी वारंवार मागणी केली या क्षेत्राचे आ डॉ धर्मरोबाबा आत्राम यांच्याकडे मागणी केली असता मागणीची दखल घेऊन मागील वर्षी या नाल्यावर नवीन पूलाची बांधकाम मंजुर करण्यात आले होते सुरुवातीला कामाला वेग होता पावसाळया दरम्यान बांधकाम पूर्णपणे थांबवण्यात आले पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही बांधकामाला सुरुवात न केल्याने येथील नागरिक तीब्र रोष व्यक्त करत चक्काजाम आंदोलनाच्या तयारीत आहेत निधी अभावी सदर काम रखडले असुन तरी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे येणान्या एक दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अभियंता कपिल यांनी दिली आहे.



