▪️मिलिद एकबोटे ला जीवन गौरव पुरस्कार देऊ नये यासाठी जागरूक नागरिक समितीचा विरोध..
▪️भीमा कोरेगाव मधील दंगलीच्या सुत्रधाराना पुरस्कार देऊन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान तरुणांना काय संदेश देणार आहे ?
मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभुळकर
पुणे – ( इंडिया 24 न्यूज ) : शरद नगर चिखली मधील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाना तर्फे होणारा दर वर्षी तरुणांना प्रोत्साहन आणि योग्य संदेश देण्यासाठी विविध व्याख्यान माला होते , पण जानेवारी 2024 मध्ये याचं प्रतिष्ठाना तर्फे भीमकोरेगाव दंगल सूत्रधार मिलिंद एकबोटे ला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी चिखली परिसरात बॅनर लावले असल्यामुळे जागरूक नागरिक समितीने त्यावर सविस्तर लेखी निवेदन चिखली पोलिस स्टेशन आणि आयोजक स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान ला देण्यात आले.
निवेदनात मिलिद एकबोटे ना तरुणानं समोर सन्मानित करू नये , यामुळे समाज आणि तरुणामध्ये गुन्हेगारी चं उद्दातीकरणं होईल आणि दंगलखोर व्यक्ती चं बळ वाढेल.. हे होऊ नये म्हणुन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान च्या अध्यक्ष / उपाध्यक्ष ना लेखी निवेदन देण्यात आहे.
निवेदन देताना जागरुक नागरिक समितीचे अविनाश लाटकर , राघू बनसोडे , गौतम गायकवाड , संजय बारी , स्वप्निल जेवळे , सचिन मानव , ज्ञानेश्वर महाजन , विकास सुर्यवंशी , रत्नदीप जावळे , अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते.