ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्स्व” अंतर्गत निबंध स्पर्धा.

संपादक -: शिल्पा बनपूरकर.

गडचिरोली,(इंडिया 24 न्यूज )दि.03: भारतीय स्वातंत्रयाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर,देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्स्व” या उपक्रमांर्तगत विविध कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करणे अपेक्षित आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम/स्पर्धा/ कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयाअंतर्गत “21 व्या शतकात कौशल्य्‍ विकासाचे महत्त्व ” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यांत येत आहे. या निबंधस्पर्धेत सहभागी होण्याकरिता इच्छूक उमेदवारांनी निबंध लिहून gadchirolirojgar@gmail.com या ईमेलवर किंवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयात दि.13 ऑगस्ट 2022 पर्यंत जमा करावे.
या निबंध स्प्र्धेअंतर्गत रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यांत येईल. अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शासकीय संकुल बॅरेक क्र.-2,युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा,सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडिचिरोली यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.