अखेर! मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे; तर दुसरीकडे रास्ता रोकोमुळे गुन्हाही दाखल..
सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
मुंबई (इंडिया 24 न्यूज )मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल सतरा दिवसानंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे.जरांगे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्यांनी उद्यापासून राज्यात धरणे आणि साखळी उपोषण करा” असे आवाहन मराठा बांधवांना केले आहे.
गेल्या 17 दिवसांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी OBC कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीला धरून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र त्यांनी आज हे उपोषण मागे घेतले आहे.
जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल
जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर व अमनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना *रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर मराठा आंदोलन आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.