ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

नागरिकांना मतदाना पासून वंचित ठेवणाऱ्यावर कारवाई करा : राजुरेड्डी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राची निवडणूक ही 19 एप्रिल रोजी पार पडली सदर निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रचंड उत्साहात नागरिक रखरखत्या उन्हात घराबाहेर पडले मात्र अनेक नागरिकांचे मतदार यादीतुन गहाळ झाल्याने,मतदारांचे नाव डिलीट करण्यात आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले यासोबतच मतदारांचे नावे त्यांच्या प्रभागाच्या मतदान यादीत नसून संपूर्ण शहरभर अन्य ठिकाणी टाकण्यात आले तर अनेक मतदारांचे नावे चंद्रपूर येथील मतदान केंद्रावर टाकण्यात आले एकंदरीत झालेल्या या भोंगळ कारभाराने जवळपास 10% मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासन कार्यरत असल्याची जाहिरात सतत प्रसारित केली जात असते तर दुसरीकडे प्रत्यक्षात मृतांची नावे यादीत समाविष्ट असून जिवंत व्यक्तीचे नावे यादीतून गहाळ केल्या जात आहे
आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाचे नावे ज्यापद्धतीने कपात करण्यात आली ते नक्कीच कटकारस्थाने करूनच कमी करण्यात आली असल्याने यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच घुग्घूस नगरपरिषदेच्या संपूर्ण अकरा प्रभागाच्या मतदारयादीचे पुनर निरीक्षण व दुरुस्ती करावी व गहाळ झालेल्या नागरिकांची नावे परत मतदार यादीत समाविष्ट करावी अशी मागणी घुग्गूस काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.