ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
जनतेचा विश्वास गमावलेल्या, महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणं हा जनतेचा अपमान!
सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी; वीज बील माफी द्यावी. पेपरफुटीविरोधात याच अधिवेशनात कायदा आणावा.
*🔸अरविंद चहांदे*
*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*
*🔸मो.940571416
5*
राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. जनतेचा विश्वास गमावलेल्या महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महाभ्रष्टाचारी सरकारचा चहा घेणं हा, लोकशाहीचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे.