▪️आंबेडकरी समाजातर्फे ‘जालौन’घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांनां निवेदन.. !
जिल्हा प्रतिनिधी -: अरुण माधेशवार.
सिंदेवाही -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला राजस्थान राज्यातील जालौर मधील खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांने शाळेतील दलित विद्यार्थ्याला शिक्षकांसाठी ठेवलेल्या मडक्यातील पाणी पिल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली .यामुळे त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला .त्यामुळे या हत्येला जबाबदार असणाऱ्या त्या मुख्याध्यापकाला फाशी देण्यात देण्यात यावी .आणि मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात यावा.अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील आंबेडकरी समाजाने माननीय तहसीलदार सिंदेवाही यांना दिलेल्या निवेदनातून प्रतिनिधी शिष्टमंडळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ,प्रधानमंत्री व केंद्रीय गृहमंत्री ,भारत सरकार नवी दिल्ली यांना केली आहे .
सदर निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शिष्टमंडळ प्रमूख ‘ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ़ इंडिया’चे तालुका अध्यक्ष विकास गेडाम बामसेफचे विजय रामटेके ,भारतीय बौध्द महासभाचे जिल्हा अध्यक्ष डाँ.राजपाल खोब्रागडे ,बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष डाँ.रेवानन्द बाम्बोळे ,वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष धनोज खोब्रागडे यांच्यासहीत चंद्रप्रकाश चहान्दे ,प्रा .दयाराम मेश्राम , तेजेन्द्र नागदेवते,शीतलताई शेंडे ,मायाताई गेडाम ,नलिनीताई बाम्बोळे ,अल्काताई उंदीरवाडे व हर्षल लिंगायत आदी उपस्थित होते .