▪️घणसोलीतील हॉटेल व्यावसायिक कडून अन्नाची नासाडी व दुर्गंधी..
सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधि.
नवी मुंबई : (इंडिया २४ न्यूज) : नवी मुंबईतील घणसोली येथील सेक्टर १ मध्ये हॉटेल व्यावसायिक यांच्याकडून अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. ते अन्न ना कुणाच्या मुखात जात आहे ना कुणाच्या उपयोगी पडत आहे. कचरा डब्यात टाकलेले अन्न हे रस्त्यावर सांडलेल्या अवस्थेत आढळले आहे.
सेक्टर १ मधील “हॉटेल मनपसंद” नावाच्या हॉटेल मधील उरलेले अन्न तेथिल कर्मचाऱ्याने कचऱ्याच्या डब्यात टाकले , रात्रीच्या वेळेस काही भटक्या श्वानांकडून तो डब्बा पडला गेला, त्यामुळे रस्त्यावर ते अन्न विखूरले गेले.
राज्यात काही ठिकाणी लोकांना पोटभर अन्न मिळत नसल्याने त्यांचा भुकबळीने जीव जात आहे, आणि इथे अन्नाची नासाडी होत आहे. प्रशासनाने अश्या हॉटेल मालकांवर अन्नाची नासाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्या कारणी गुन्हा नोंदवून त्यांच्यावर उचित कारवाई करन्यात यावी .