ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️काशीपूर व अंकोला गावात कॉलराचा प्रादुर्भाव..

▪️आरोग्य विभागाने थाटले गावातच कॅम्प, रुग्णांवर उपचार सुरू..

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी तालुक्यातील पंचायत समिती चामोर्शी व ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत येणाऱ्या काशीपूर व अंकोला या दोन गावात कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, काशीपूर येथे २० व अंकोला येथे ४ असे २४ रुग्ण आढळून आले आहेत. स्थानिक गावातच रुग्णांवर उपचार करण्यासाठी काशीपूर येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागाचे कॅम्प लावण्यात आले आहे. सध्या १० ते १२ रुग्णांवर उपचार सुरू असून, काही रुग्ण सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे उपचार घेत असल्याचे समजते. हा आजार दूषित पाण्यामुळे बळावल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कुनघाडा रै येथील वैद्यकीय अधिकारी डॉ गेडाम अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने आरोग्य कॅम्प सुरळीत सुरू असून, आ. डॉ मिलिंद नरोटे, चामोर्शी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राजू गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, स्थानिक सरपंच, उपसरपंच यांनी कॅम्पला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. रुग्णांची संख्या कमी होत असून आजार आटोक्यात येत असल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाने दिली आहे.
काळजी घेण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे आव्हान
स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत काशीपूर व अंकोला या दोन गावात कॉलरा आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावकऱ्यांनी सतर्क राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत नवरगाव यांच्या वतीने जाहीर नोटीसद्वारे करण्यात आले आहे. ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे मात्र पाईप लिकेजमुळे सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलकुंभातील पाण्याचा वापर करू नये, सर्व गावकऱ्यांनी नियमित स्वच्छ पाण्याचे पाणी उखडून प्यावे, तोंडाला मास्क लावावे, दोन व्यक्तीत अंतर ठेऊन बोलचाल करावी, घरातील भांड्यात साठवून ठेवलेले सर्व पाणी बाहेर काढून एक दिवस कोरडा दिवस पाडावा, अतिसाराबरोबर उल्टी, पोटदुखी, ताप रक्तमिश्रित शौच किंवा अशक्तपणा वाटत असल्यास त्वरीत जवळच्या डॉक्टर, किंवा उपकेंद्राचा सल्ला घ्यावा, अन्न पदार्थ झाकून ठेवावे तसेच हात स्वच्छ धुवून अन्न प्राशन करावे , कॉलराची लक्षणे दिसल्यास त्वरीत आरोग्य विभागाचा सल्ला घ्यावा, स्थानिक आशा वर्कर यांना संपर्क करून ओ आर एस घेऊन कोमट पाण्यात टाकून प्यावे, अशा रुग्णांना त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात यावे असे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.