आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण..

▪️पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश..

जिल्हा प्रतिनिधी -: अरुण माधेशवार.

जुलै व ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. सदर शेतपिकांची झालेल्‍या नुकसानापोटी शासनाने हेक्‍टरी १३,६०० रू. , महत्‍तम ३ हेक्‍टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नुकसान भरपाई संदर्भात पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्‍त झालेल्‍या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

गावातील शेतीचे नुकसानीचे पंचनामे प्रत्‍यक्ष शेतावर न जाता करण्‍यात आलेले आहेत, प्रत्‍यक्षात नुकसान झालेल्‍या शेताचे क्षेत्र कमी नोंदविण्‍यात आले आहे ,काही नदीकाठील गावांचे सर्व्‍हेक्षण व पंचनामे करण्‍यात आले नाही, नुकसान भरपाई मंजूर झालेल्‍या शेतक-यांची यादी ग्राम पंचायत स्‍तरावर लावण्‍यात आलेली नसल्‍याने गावातील कोणत्‍या शेतक-याला किती नुकसान भरपाई मिळाली किंवा कसे हे लक्षात येत नाही, सर्व्‍हेक्षण करणारे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी हलगर्जीपणाने सदर सर्व्‍हेक्षण केले आहे अशा तक्रारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.