आष्टि घोष्ट मार्गावर खड्डयाचे साम्राज्य अपघाताच्या घटनांत वाढ प्रशानाचे दुर्लक्ष..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
आष्टि – ( इंडिया 24 न्युज ) : आष्टि रस्ते हे विकासाचे माध्याम आहे. मात्र रस्त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अल्पावधीतच रस्त्यांची अवस्था दयनीय होत आहे. परिणामी विकासाला बाधा निर्माण होत आहे अशाच काहीसा प्रकार आष्टी घोट मार्गवार दिसुन येत आहे.
हा मार्ग पूर्णपणे खड्डयात असल्याने या मार्गावार अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे.
वारवार याकडे सबधित विभागाचे लक्ष वेधले जात असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक वाहनधारकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
जवळच सुभाष ग्राम व तुम्डी व मार्कंडा फट्यापासुन आष्टी घोट मार्गावार ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आष्टी घोट या ३० कि मी लाबीच्या मार्गावार वाहनांची वर्दळ असते या मार्गावार खड्डे निर्माण झाले
असल्याने वाहनधारक नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे खड्डे चुकविताना नजर चुकली तर अपघात घडत आहेत या मार्गावार ३ ते ४ किमी अंतरावर खड्डे पडले आहेत तसेच हा मार्ग घनदाट जंगलाने व्यापला असुन या भागात अपघात झाल्यास अपघातग्रस्तास तत्काळ रुगणालयात कुणाचीही मदत मिळत नसल्याने अपघातग्रस्तास जीव गमवावा लागत असल्याची गंभीर समस्या आहे.
अनेकदा या मर्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सबंधित विभागाकडे करण्यात पोहोचविण्यासठी आली मात्र या मागणीकडे विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. परिणामी या मार्गावरुण आवागमन करणान्या वाहनधारकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे.
भविष्यात मोठ्या अपघातची घटना घडणार नाही याकडे लक्ष देऊन तत्काळ आष्टी घोट मार्गोचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी माडणी वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.



