आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ “मैत्री मैफिली”त मैत्रीचे सूर, कवितेचे तारांगण आणि स्नेहाचा साज..

▪️अकोल्यात ‘मैत्री दिना’चे अनोखे उत्सवमंगल ठरले स्नेहसंमेलन..

 

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : मानवी जीवनाच्या गुंतागुंतीत अनेक नाती येतात आणि जातात, पण काळाच्या कसोटीत खरीखुरी उतरते ती मैत्री! आणि हीच नात्यांची रसरशीत कळी फुलविण्यासाठी अकोल्यात एक आगळीवेगळी मैफिल सजली — “मैत्री मैफिली”.सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजी चौक आदर्श कॉलनीत ही मैफिल साकारली गेली.शेतकरी जागर मंच अकोला यांच्या प्रेरणेतून आणि सौजन्याने सजलेला हा कार्यक्रम, मैत्री दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला पण याचे स्वरूप केवळ कार्यक्रमाचे नव्हते, ते होते एक भावबंध बांधणारे स्नेहसंमेलन.

संवादातून सृजन, कवितेतून बंध

या संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काव्यमैफील!
जिच्यातून अकोल्याच्या कविसंस्कृतीचे बोलके दर्शन घडले.ज्येष्ठ आणि ज्यांनी हृदयातून लिहिलेल्या शब्दांमुळे असंख्य मनांमध्ये मैत्रीची बीजं पेरली ते कवी अनंत राऊत, गोपाल मापारी, संदीप देशमुख, सुभाष काशीद, विशाल कुलट, अजय गायकवाड यांसह अनेक हौशी कवींच्या सुरेल कविता मैत्रीचा अर्थ नव्याने उलगडून दाखवत होत्या.प्रत्येक कवितेच्या ओळीतून, शब्दाशब्दांतून मैत्रीच्या नात्याचे असंख्य रंग उपस्थितांच्या मनात खोलवर रेखाटले गेले. मैफिलीत उसळलेला प्रत्येक टाळीचा आवाज म्हणजे त्या नात्याच्या गोडव्याची साक्ष होती.
कर्तृत्वाचा गौरव – अक्षय राऊत यांचा सत्कार

या हृदयस्पर्शी कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक कर्तृत्वाची नोंद घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून निवड झालेल्या उत्कृष्ट व्याख्याते अक्षय राऊत यांचा भव्य सत्कार संपन्न झाला.
त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करत मैत्री मैफिलीने त्यांच्या यशाचा गौरव साजरा केला.हा सत्कार नव्या पिढीच्या नेतृत्वातील विश्वासाची साक्ष ठरला.
विचारांचे बीज – गजानन हरणे यांचे प्रास्ताविक
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक गजानन हरणे यांनी ओघवत्या आणि विचारप्रवृत्त भाषेत सादर केले.
त्यांनी मैत्रीची गरज, सामाजिक संवादाचे महत्त्व आणि सांस्कृतिक बांधिलकीचे मोल अधोरेखित करत
मैत्री ही केवळ एक नाती जोडणारी साखळी नाही, तर ती समाजघडणीचा एक मूलभूत स्तंभ आहे, हे प्रभावीपणे मांडले.
संचालन व आभार – सुसंवादाची शैली
कार्यक्रमाचे अत्यंत नेटके, समर्पक आणि सुसंवाद संचालन प्रशांत गावंडे यांनी केले जे त्यांच्या आवाजातच नव्हे तर मन:पूर्वकतेतही दिसून आले.आभार प्रदर्शन दिवाकर देशमुख यांनी भावनिक शब्दांत करत, उपस्थितांचे अंत:करणपूर्वक आभार मानले.

स्नेहबंधांना भेटले नवसंजीवन

या कार्यक्रमात अकोल्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, युवा कार्यकर्ते, कवी, क्रीडापटू व पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यामध्ये प्रा. दादाराव पाथरीकर ,शिवाजी म्हैसने , शेख अन्सार, डॉ. कृष्णकांत वक्टे, नारायण मानकर, वाशिमभाई, रवी अरबट, देवराव हागे, प्रदीप चोरे, कपिल ढोके, अरविंद कांबळे, पुरुषोत्तम राऊत, नंदकिशोर गावंडे, पराग गवई, विजय भटकर, प्रमोद धर्माळे, मनोज अग्रवाल, प्रशांत नागे, डॉ. संतोष मोरखडे , संजय इंगळे, ज्ञानेश्वर सुलताने, संजय भांबेरे विजय देशमुख, शंकर कंकाळ, बाळू ढोले, श्रीकृष्ण माळी, विनायक धोरण, शंकर लंगोटे, सुरेश लूले , एडवोकेट सविता खोटरे, राजेश मंगळे, चांदभाई, तुषार हांडे, एडवोकेट रहेमान,यांसह अनेक मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

संवाद, स्नेह आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम

या कार्यक्रमाच्या निमित्ताने “मैत्री” या दोन अक्षरी शब्दाची व्याप्ती नव्याने अनुभवता आली.कवितांच्या सुरेल लकेरींनी मैत्रीची व्याख्या व्यापक केली,सत्कारांच्या उत्साहाने नेतृत्वाचा गौरव केला,तर स्नेहसंवादाने नात्यांना नवे बळ दिले.”मैत्री मैफिली” केवळ एक कार्यक्रम नव्हता .
तो होता एक भावनांचा महोत्सव,संवादांचा एक उत्सव,
आणि सृजनशीलतेच्या धाग्यांनी गुंफलेला स्नेहाचा शृंगार. कार्यक्रमाचा शेवट स्नेह भोजनाने झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.