▪️राष्ट्रवादी (श.प )काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन..
▪️इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर सक्ती विरोधात प्रतिकात्मक मिटरची होळी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : भाजपा एनडीए सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेशी मन की बात करत असतानाच देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर ची दरवाढ भरमसाठ केल्याने सामान्य जनतेला जिवन जगणे कठीण झाले आहे. गृहीणी ला स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस सिलेंडर च्या किंमतीत 29 रुपयाने सरसकट वाढ केल्याने तसेच छोट्या व्यवसायिकांसाना लागणा-या सिलेंडरच्या दरात ही दरवाढ करुन एक प्रकारे जनतेवर अन्याय केलेला आहे. या दरवाढीचा निषेधार्थ चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. बेबीताई उईके यांचे नेतृत्वात जोरदार नारेबाजी करीत आंदोलन छेडण्यात आले. एकीकडे देशातील जनतेला अच्छे दिना चे वादे करत असताना दुसरीकडे मोदी सरकारने देशातील गोरगरीब आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकललेलं आहे असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही.
आपल्याला खरोखरच गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या जीवन जगण्यासाठीचा खऱ्या अर्थाने विचार करायचा असेल तर गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोल ची झालेली दरवाढ तात्काळ मागे घेवून जनतेला दिलासा देण्याचे काम करावे अशा प्रकारची विनंती करतानाच, महागाई कमी न झाल्यास तसेच डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढ मागे न घेतल्यास आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भीत इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके यांनी भारत सरकारचे पंतप्रधान यांचे नांवे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन दिलेला आहे. सोबतच सध्या विद्युत मंडळाच्या वतीने नविन इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर सक्तीने लावण्यात येत आहे. या मिटरचे ग्राहकांना तिप्पट बिल येत असल्याने महाराष्ट्र शासनाने या मिटरची सक्ती त्वरित थांबवावी अशी मागणी याप्रसंगी करून प्रतिकात्मक इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर ची होळी करण्यात आली.
अधिक वृत्त असे की, मोदी सरकारने पुर्ण केलेल्या बारा वर्षांच्या काळात आदिवासी जनतेचे वनवासीकरण करण्याचा अप्रत्यक्षपणे घाट घालण्याचा प्रयत्न केलतो त्वरित बंद यावा.अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके यांनी पुढे असे म्हटले की, आदिवासी हे वनवासी नसुन या देशाचे मुळ मालक आहेत. अनादी काळापासुन आदिवासींचे अस्तित्व असुन ते जल , जंगल, व जमीनीचे मालक आदिवासींना वनवासी संबोधुन त्यांना त्यांच्या हक्कापासून दुर करण्याचे षडयंत्र केल्यास शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी सरतेशेवटी म्हटले आहे.
यावेळी आंदोलनात उपस्थित आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष जाणार्धन गेडाम शहर ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा. विठ्ठल मस्की, वकील सेल अध्यक्ष ऍड. प्रवीण वाकुळकर युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मलारप्प विध्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर शहर उपाध्यक्ष दीपक कटकोजवार, सरचिटणीस आनंद तिरानकर सरचिटणीस मनीष मोडक, सचिव अरविंद परचाके अनुप बेले , वामन वाडगुरे सरचिटणीस रुपेश मुलकावार, सिद्धार्धा मेसराम रवी सातपुते किशोर शेडमाके रवी ठाकरे, मदन उके. दिलीप आत्राम सरस्वती गावंडे, अनुप बेले, मनिष मोडक, मदन उके, सिध्दार्थ मेश्राम, दिलीप आत्राम, वामनराव वाटगूरे दिवाकर धोबे किशोर शेडमाके , परमेश्वर वाघमारे उषा आत्राम, शोभा घरडे, सुनीता नन्नावरे, लता जांभुळकर ,सुनंदा महाते ,हंसा मोहुर्ले ,वाघमारे ताई, सुनीता मडावी ,रंजना ताई, कविता प्रज्वल धोबे आदित्य ठाकरे निशांत वैद्य धकाते यांचेसह आंदोलनात असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



