▪️तुमडी येथील दोन ते तिन वर्षपासुन नऴाचं पाणी पूर्णपणे बंद..
▪️भर उन्हाळयात गावकव्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हातील मुलचेरा तालुक्यातील आडपल्ली (माल) ग्राम पंचायत मध्ये येनारे तुमडी येथील मागील दोन तिन वर्ष पासून पाण्याच्या टाकीने नळादारे होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थापना तीव्र पाणी टचांईचा सामना करावा लागत आहे भर उन्हाळात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून महिला जेष्ठ नागरिक व लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत गा, वातील अनेक कुटुंबांन दैनंदिन वापरासाठी विहीर वरून दूसरे वडतून खुप दुरून पाणी आणावे लागत आहे काही ठिकाणी उपलब्ध असलेले पाणी अपुरे असल्याने नागरिकांमध्ये नाराजीजे वातावण निर्माण झाले आहे वारंवार तक्रार करुनही ग्राम पंचायत दुर्लक्ष करीत आहे एकीकडे भारत सरकार जल जीवन मिशन योजना राबवित आहे मात्र आडापल्ली माल ग्राम पंचायतचे कागदावर दिसत आहे ही खूप मोठी शोकांतीका आहे आणी काही गावामध्ये मुख्यमंत्री पंचायराज अभियान मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे मात्र आडपल्ली माल साधी स्वछता अभियान सुध्दा राबविले नाही जिकडे तिकडे कचराच कचरा नाली पूर्णपणे भरून प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे पण प्रशासन कुंभकरणी झोपेतच आहे त्यांना पाणीटंचाई दिसत नाही दोन तिन वर्ष होऊन टाकीला नळाचं पाणी नाही त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांनी पाणी प्यायाचं कुठलं आणि अंघोळ करायचं की नाही?असे प्रश्न निर्माण होत आहे आहेत ग्रा-मस्थाच्या म्हाण्यानुसार उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी करण्यात येत आहे उन्हाळ्याच्या तिब्रतेमुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असुन प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन संबधीत ग्राम पंचायत अधिकारी कारवाई करण्यात यावी जेणे करून ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि गावातील पाणी समस्या कायमस्वरुपी सोडविण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ही आडपल्ली माल गड ग्राम पंचायतचे ग्रामस्थानी इशारा दिला आहे


